महाराष्ट्रात खूप शेतकरी अजूनही पावसाच्या पाण्यावर शेती करतात. पण पावसावर आता भरवसा ठेवता येत नाही, कारण हवामान सतत बदलत आहे. त्यामुळे शेतात पाण्याची कमतरता भासते आणि शेतीचे उत्पादन कमी होते. हे लक्षात घेऊन सरकारने “मागेल त्याला शेततळे योजना 2025” सुरू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे. या योजनेमुळे शेतात एक लहान तळं बनवता येतं, जे पावसाचं पाणी साठवून ठेवतं. हे पाणी नंतर शेतीसाठी वापरता येतं.
ही योजना विशेषतः जिथे पाऊस कमी पडतो अशा मराठवाडा, विदर्भ, खानदेश भागात खूप उपयोगी ठरत आहे. एकदा शेततळं तयार झालं की ते अनेक वर्षं चालतं. त्यामुळे पाणी वाचतं आणि उन्हाळ्यात व हिवाळ्यात सुद्धा शेती करणे शक्य होतं. या तळ्यात साठवलेलं पाणी ड्रिप, स्प्रिंकलर किंवा मोटरने वापरता येतं. यामुळे पाणी सुद्धा वाचतं आणि शेतीला वेळेवर पाणी मिळतं.
या योजनेचा मोठा फायदा म्हणजे सरकारकडून मिळणारं आर्थिक अनुदान. शेततळं खोदायला जास्त खर्च लागतो. त्यामुळे बरेच शेतकरी ते करू शकत नाहीत. पण या योजनेमध्ये सरकार थेट बँक खात्यात ५०,००० रुपयांहून अधिक रक्कम अनुदान म्हणून देते. यामुळे शेतकऱ्यांवरचा खर्च कमी होतो. जेव्हा शेतात भरपूर पाणी साठवता येतं, तेव्हा पीक चांगलं येतं आणि उत्पन्न वाढतं. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होतो.
या योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्रं लागतात. उदाहरणार्थ – आधार कार्ड, पॅन कार्ड, ७/१२ उतारा (जमीन किमान ०.६० हेक्टर असावी), जात प्रमाणपत्र (जर अर्जदार मागासवर्गीय असेल), महाराष्ट्रात रहिवासी असल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार लिंक असलेलं बँक पासबुक आणि दोन पासपोर्ट फोटो. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याजवळ कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असणं आणि त्या जमिनीत तळं बनवण्यासाठी जागा असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करायची आहे. नंतर आधार नंबर आणि बँक तपशील टाकून लॉगिन करायचं. ‘सिंचन साधने’ या विभागात ‘वैयक्तिक शेततळे योजना’ हा पर्याय निवडायचा. त्यानंतर शेततळ्याच्या लांबी, रुंदी, खोली अशा सगळ्या माहिती भरून अर्ज करायचा. योग्य कागदपत्रं आणि जागेची माहिती दिल्यास लवकरच योजना मंजूर होते आणि पैसे बँकेत जमा होतात.
ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप मदतीची ठरत आहे. त्यामुळे ज्यांना पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग करायचा आहे, त्यांनी लवकरच अर्ज करावा.